
बाणेर येथील श्रीराम समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. हिला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे सन २०२४-२५ साठीचा मानांकित राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार कर्नाटक येथील डेनिसन्स रिसॉर्ट येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
फेडरेशनचे अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “श्रीराम समर्थ पतसंस्थेने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत इतर संस्थांना मार्गदर्शक दिशा दिली आहे.”
संस्थेच्यावतीने पुरस्कार संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय तापकीर, कार्याध्यक्ष श्री विवेक कळमकर, संचालक श्री सुधाकर धनकुळे, श्री ऋषिकेश तापकीर, तसेच मुख्य व्यवस्थापक श्री संतोष कोलते आणि अधिकारी श्री राहुल सरदार यांनी स्वीकारला.
संस्थापक श्री दत्तात्रय तापकीर यांनी सांगितले की, “संस्थेच्या प्रगतीत संचालक, सेवक आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे.” कार्यक्रमास राज्यातील अनेक नामांकित पतसंस्था उपस्थित होत्या.