

जगात युद्ध लष्करी संघर्ष नसून वित्तीय व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन बसलेला महासत्ता, बड्या कंपन्यांचा करोडो डॉलर्सच्या नफ्याचा खेळ झाला आहे. जागतिक नेत्यांची वीक एंडची भडक विधाने व शेअर बाजारातील चढ उतार क्रूर नफाखोरीचा प्रकार आहे. युद्धात कच्या तेलाचे दर वाढून भडकलेली जागतिक महागाई युद्ध संपले तरी कमी होत नाही. बड्या तेल कंपन्या मात्र नफा लुटतात. भारताचा युद्धात सहभाग नसला तरी आयातीत दरवाढ होते. महागाई वाढते. सहकारी बँकांनी या काळात सावध धोरण ठेवले पाहिजे . जागतिक बाजारात युद्धाच्या नावे चालणारा हा खेळ व निरपराध लोकांचे होरपळणारे भविष्य हेच चालू शतकातील मानवाचे सर्वात मोठे नैतिक आणि आर्थिक अपयश आहे.....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वर्धापन विशेषांक, मे-जून २०२६ पहा.)