

विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंड मिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला स्वतःचा अर्थसंकल्प आखावा लागतो. शासनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर पुढील आर्थिक वर्षातील शासकीय जमा-खर्चाचे वार्षिक विवरणपत्र म्हणजे अर्थसंकल्प होय. याला इंग्रजीमध्ये ‘बजेट’ असे म्हणतात.
‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला जातो आणि संपूर्ण देशाचे लक्ष या एका दस्तऐवजाकडे लागलेले असते. समाजातील प्रत्येक घटकाला मग तो वैयक्तिक करदाता असो की एखादी व्यावसायिक संस्था या अंदाजपत्रकाबाबत प्रचंड उत्सुकता असते. प्रत्येकाच्या अपेक्षा व्यक्तिसापेक्ष असतात; प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते की यातून ’मला नेमकं काय मिळणार आणि मी काय गमावणार?’ मात्र, हा विचार करताना आपण अनेकदा केवळ तात्कालिक परिणामांचाच विचार करतो. खर्या अर्थाने विचार करायचा झाला तर, अर्थसंकल्पाचे दीर्घकालीन आणि अदृश्य परिणाम आपल्या व्यवसायवृद्धीवर किंवा वैयक्तिक आयुष्यावर कसे होणार, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. अंदाजपत्रकाला नेहमीच दोन बाजू असतात आणि ज्या बाजूने आपण त्याकडे पाहतो, तशीच प्रतिमा आपल्याला दिसत असते. राजकीय प्रतिक्रिया नेहमीच एकांगी असल्या तरी, ‘संकल्प’ या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे ‘निर्णय’. माणसाच्या निर्णयक्षमतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हाच निर्णय जेव्हा देशाच्या तिजोरीबाबत घेतला जातो, तेव्हा तो कोट्यवधी लोकांचे भविष्य ठरवतो....(To continue, open the magazine)