

तंत्रज्ञान व मनुष्यबळ या बँकिंगच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट बँकिंग, यूपीआय, फिनटेक कंपन्यांच्या आगमनामुळे बँकिंगचा चेहरामोहरा बदलला. या बदलातील मोठा प्रश्न म्हणजे बँकिंगचा नवा चेहरा तंत्रज्ञान की मनुष्यबळ? तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी बँकिंगमध्ये मनुष्यबळाचे महत्त्व कमी होत नाही. कारण बँकिंग विश्वासाचा व्यवसाय आहे. ग्राहकांना आर्थिक निर्णय घेताना मानवी मार्गदर्शनाची गरज असते. ग्रामीण भागात अजूनही बँक कर्मचार्यांवर विश्वास ठेवतात. भविष्यातील बँकिंग हे ‘तंत्रज्ञान विरुद्ध मनुष्यबळ’ असे नसून ‘तंत्रज्ञानासोबत सक्षम मनुष्यबळ’ असेल. हाच समतोल आधुनिक बँकिंगला सुरक्षित व ग्राहकाभिमुख बनवेल...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी द्विशतकी विशेषांक, जुलै २०२६ पहा.)