युद्धजन्य परिस्थिती : भारतीय बँका व अर्थव्यवस्था

अ‍ॅड. सुभाष मोहिते, पुणे, मानद सचिव
युद्धजन्य परिस्थिती : भारतीय बँका व अर्थव्यवस्था
युद्धजन्य परिस्थिती : भारतीय बँका व अर्थव्यवस्था युद्धजन्य परिस्थिती : भारतीय बँका व अर्थव्यवस्था
Published on

जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा भारतावर अप्रत्यक्ष पण गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतो. तेलाच्या किंमतीतील वाढ, महागाई, व्याजदर वाढ, रोजगारातील अस्थिरता, गुंतवणुकीतील घट आणि बँकांच्या थकबाकीत वाढ यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे सरकार, बँका, उद्योग आणि नागरिक यांनी संयम, बचत, योग्य आर्थिक नियोजन आणि जबाबदार आर्थिक व्यवहार यांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि सक्षम धोरणांद्वारे भारत या जागतिक संकटांवर मात करू शकतो आणि आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवू शकतो.

सध्या जगभरात विविध देशांमध्ये वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर बनली आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील तणाव, तेल उत्पादक देशांमधील संघर्ष आणि महासत्तांची वाढती हस्तक्षेपात्मक भूमिका यामुळे जगातील अनेक देश आर्थिक संकटाच्या छायेत आले आहेत. अमेरिका, इराण, इस्राईल, रशिया-युक्रेन यांसारख्या देशांमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होत असून त्याचे दूरगामी परिणाम भारतासारख्या विकसनशील देशावरही होत आहेत. भारताचा या युद्धांशी थेट संबंध नसला तरी भारताची अर्थव्यवस्था जागतिक व्यापार, आयात-निर्यात आणि ऊर्जा पुरवठ्यावर अवलंबून असल्याने या परिस्थितीचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग क्षेत्र, उद्योगधंदे आणि सर्वसामान्य नागरिकांवर स्पष्टपणे जाणवू लागले आहेत.....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वर्धापन विशेषांक, मे-जून २०२६ पहा.)

Banco News
www.banco.news