

आता जवळपास सर्व बँकिंग सेवा डिजिटल स्वरूपात आणि स्वयंचलित पद्धतीने पार पाडतात. ग्रामीण व सहकारी बँकिंग क्षेत्रात मानवी संवादाची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. बदलत्या काळात बँक कर्मचारी सेवा देणारा आणि सल्लागार बनला पाहिजे. आजच्या डिजिटल युगात नवीन तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, ग्राहक व्यवस्थापन या सर्व क्षेत्रात कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. बँकांनी आपल्या कर्मचार्यांसाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भविष्यातील बँकिंग हे पूर्णपणे डिजिटल असेल. परंतु त्यात मानवी स्पर्श कायम राहील. बँकिंग क्षेत्रात परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि मानवी मूल्यांचे जतन हीच यशाची गुरुकिल्ली असेल...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वर्धापन विशेषांक, मे-जून २०२६ पहा.)