

या कठोर नियमांमुळे लाभांश वितरणाचे समीकरणच बदलले आहे. पूर्वी फक्त नफा (Net Profit) बघून लाभांश जाहीर केला जाई. आता आरबीआयने पूर्वीचेच लाभांश वितरणाचे निकष अधिक कडक करून जणूकाही हे पाच सुरक्षा दरवाजे (Five Conditions) बँकेच्या तिजोरी सुरक्षेसाठी बसवले आहेत. या पाचही कसोटीमधून उत्तीर्ण झाल्याशिवाय सभासदाला आता लाभांशाचा लाभ पोहोचणार नाही.
सहकार क्षेत्रातील सर्वात मधुर शब्द कोणता असेल तर तो आहे ‘लाभांश’ (Dividend). सहकारी संस्थेच्या अर्थकारणात ‘लाभांश’ हा नेहमीच चर्चेचा आणि उत्साहाचा विषय असतो. संस्थेच्या नफ्यातून मिळणारा हा ‘वाटा’ म्हणजे सभासदांनी केलेल्या गुंतवणुकीवरील ‘मालकी हक्काचा’ परतावा. पण आता सहकारी बँकांच्या (नागरी आणि राज्य किंवा जिल्हा सहकारी) या लाभांश-उत्सवावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले कडक ‘नियामक’ (Regulator) कवच अधिक घट्ट केले आहे....( संपूर्ण लेख वाचण्यासाठी डिसेंबर २०२५ मासिक पहा.)